धरणगाव तालुका प्रतिनिधि – राजु बाविस्कर,
धरणगाव येथील पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आली असून नगरपालिका प्रशानाने करोडो रुपये खर्च करून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही शहरात आजही सात ते आठ दिवसांत पाणी पुरवठा केला जात आहे, धरणगाव नगरपालिका ची निवडणूक मध्ये घोषणा चा पाऊस पडला धरणगाव ला तीन दिवसांत पाणीपुरवठा होत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र शहराला आठ दिवसांनी होत आहे, शिवसेना उ बा ठा ला नागरिकांचा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पाणीपुरवठा अभियंता ला मागणी चे निवेदन देण्यात आले निवेदनात खालील प्रमाणे मागणी करण्यात आली आहे
शहरात काही भागात सात ते आठ दिवसापासून पाणीपुरवठा होत नाही आपले नगरपरीषदेचे कर्तव्य आणि अंमलबजावणी याची जाणीव करून देतो की आपण नागरिकांना १३५ लिटर पाणी दर दिवशी देण्याचे महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची नियमावली असताना शहरात नागरिकांना ७ते ८ दिवसात पाणीपुरवठा होतो, पाण्यापासून वंचित आहेत, तसेच महाराष्ट्र जिवन प्राधिकरण जळगाव यांनी प्लॅन, ईस्टीमेट, डिझाईन नुसार काम झालेले दिसत नाही म्हणून पाणी पुरवठा व्यवस्थित होवू शकत नाही, पाणी न मिळाल्यामुळे नागरिकांचे खूपच हाल होत आहे, ज्या ठिकाणी काही तृटी मुळे पाण्यात विलंब होत असेल तर संबंधित नागरिकांना दवंडी, माहिती, मिळणे आवश्यक आहे तसेच त्या भागाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था केली पाहिजे पण तसेही काही दिसत नाहीतरी आपण नगरपरिषद नियम 1965 अन्वये आपल्या कर्तव्यात कसूर होतांना दिसत आहे तरी यांची तक्रार आम्ही देत आहोत तरी या तक्रारीचा प्रति आम्हाला खुलासा व लेखी उत्तर मिळावे तसेच विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावी असे मागणी चे निवेदन सादर करण्यात आले
यांची होती उपस्थिती
शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ युवासेना जिल्हा प्रमुख तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी , भागवत चौधरी , जितेंद्र धनगर, विनोद रोकडे, गजानन महाजन सह पदाधिकारी उपस्थित होते

मुख्य संपादक : विनायक पाटील






















