मुख्य संपादक विनायक पाटील
चोपडा नगरपरिषदेत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण, सौंदर्यकरण व रंगरंगोटी (कलरिंग) करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरसेवक गजेंद्र अरविंद जैसवाल यांनी मुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद यांना पत्र देऊन ही मागणी केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक म्हणेच चोपडा शहरातील प्रतिष्ठित स्थळे आहेत. हे महापुरुष संपूर्ण समाजाला दिशा देणारे, प्रेरणा देणारे व मार्गदर्शक आदर्श आहेत. सध्या सदर पुतळ्यांची रंगरंगोटी फिकट झालेली असून सुशोभीकरणाची नितांत गरज आहे.
येणाऱ्या काळात लवकरच या महापुरुषांच्या जयंती उत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने व सार्वजनिक सहभागातून साजरे होत असतात. अशा पवित्र आणि प्रेरणादायी प्रसंगी स्मारक सुशोभित, स्वच्छ व देखणे असणे हे सर्व नागरिकांसाठी गौरवास्पद ठरेल.
नगरसेवक गजेंद्र अरविंद जैसवाल यांनी मुख्याधिकारी चोपडा नगरपरिषद यांना पत्र देऊन पुतळ्यांचे सुशोभीकरण, सौंदर्यकरण व कलरिंग करण्याबाबत संबंधित विभागास तातडीच्या सूचना देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

मुख्य संपादक : विनायक पाटील






















