मुख्य संपादक विनायक पाटील
राज्यातील ऑटो रिक्षा चालक अनेक अडचणींना सामोरे जात आहे वेळोवेळी शासनाकडे मागण्या मांडूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे सरकारचे लक्ष याकडे जावे व मागण्या मान्य व्हाव्या यासाठी ऑटो रिक्षा चालक राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय
दि. ४/१०/२०२५ रोजी , मुंबई येथे ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीची राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आला खांन्देशात हे आंदोलन जळगाव येथे होणार असुन विभागीय स्तरावर टप्पा निहाय आंदोलन करण्यात येईल ऑटोरिक्षा कॄति समितीचे अध्यक्ष मा. शशांक राव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. मंचकावर मा. शशांक राव साहेब सोबत समितीचे सरचिटणीस मा. विलास भालेकर साहेब , कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे (खांन्देश विभाग)
मारूती कोंडे ( मुंबई विभाग ), अहमद बाबा ( मराठवाडा विभाग), सोबतच समितीचे सल्लागार मा. शंकरजी साळवी साहेब आणि समितीचे प्रवक्ता मा. इमरान पठाण प्रामुख्याने विराजमान होते यावेळी विजय पाटील प्रकाश साखरे राहूल वारे सिताराम तामाणी ओमिन शेख किशन मिरेकर नाना वैध अजय रामटेके निजामुद्दीन शेख ज्ञानेश्वर कोळी श्रीरंग जाधव नामदेव जगताप रंजनाताई चव्हाण महमद मोसिन प्रमोद वाणी किशोर खरताडे किरण गवळी तसलीम खान फकिरा चव्हाण भुषण वाणी पद्मनाभ गिते सतिष वाघमारे यांच्यासह राज्यातील विविध संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी व रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभा संचालन समितीचे कार्याध्यक्ष मारूती कोंडे यांनी केले तर सभेची सांगता कार्याध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी केले या बैठकीत खालील मुद्द्यांवर राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला स्व. आनंद दिघेऑटो रिक्षा व मिटडऀ टॅक्सी कल्याणकारी मंडळातील त्रुटी दूर करा.महामंडळाची सदस्यत्व फि रद्द करा आणि लाभ स्पष्ट करा. छुप्या पद्धतीने फोटो काढून चालान
पाठवण्याची पद्धत बंद करा. गुन्हा झाला तरच चालान करा व या आधीचे सर्व चालान रद्द करा राज्य शासनाने नुकतीच ई बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे हि ई बाईक टॅक्सी प्रवाशांच्या दृष्टीने धोकादायक आहे तसेच ती ऑटो रिक्षा चालकांच्या उपजीवीकेवर गंडांतर आहे तीची परवानगी रद्द करण्यात यावी महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातील अवैध वाहतूक बंद करण्यात यावी शहरातील ई बाईक व ई रिक्षा वाहतूक नियमानुसार करण्यात यावी या वाहनांना परवाना व अन्य नियम लावण्यात यावे.
उत्तर महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यातील रिक्षा चालकांच्या व्यथा व समस्या प्रल्हाद सोनवणे यांनी
समितीच्या निदर्शनास आणून दिल्यात .केवळ एक आंदोलन केले की सर्व मागण्या मान्य होतात असे नाही , पण आपल्या आंदोलनाची नोंद मात्र सरकार घेते , आणि जर आपण आपल्या अधिकारा करिता लढलोच नाही तर काय मिळविणार ? तरीपण येणाऱ्या महिन्यात आपण टप्या टप्प्याने राज्यव्यापी आंदोलन उभारू त्याकरिता आपण आपल्या संघटनेची तयारी असावी असे जाहीर आव्हान आजच्या सभेचे सभाध्यक्ष मा. शशांक राव साहेब यांनी केले तर कल्याणकारी महामंडळाची लढाई केवळ एका महिन्याची किंवा एका वर्षाची नसुन मागील विस वर्षा पासून सातत्याने लढा दिला आहे तरीपण आपण पुर्णतः मंडळ प्राप्त केलेला नाही देणे असावे तर लाभकारी असावे जेणेकरून आपण आपल्या ऑटो रिक्षा चालकांचे जीवन आणि अडीअडचणी भागवू शकू तरच कल्याणकारी मंडळ कल्याणकारी होणार असे ठामपणे विलास भालेकर यांनी सांगितले
मुंबईच्या ठाकूरद्वार येथील मुंबई टॅक्सी रिक्षा चालक युनियनच्या सभागृहात राज्यव्यापी बैठक संपन्न झाली.

मुख्य संपादक : विनायक पाटील






















